स्थळ - कोथरूड, पुणे
दिवस - अलीकडचेच
काही दिवसांपूर्वी मी कोथरूड परिसरातील एका लग्नाला गेलो होतो. पुणेकरांचं कसं प्रत्येक गोष्ठीत वेगळं लॉजिक असतं. लग्न - समारंभाला वगैरे ५० व्यक्तींनाच परवानगी असली तरीही सांगताना मात्र सांगणार की, "सगळ्यांनी सहपरिवार यायचं हं लग्नाला, पण जेवण मात्र फक्त ५० लोकांसाठीच आहे."
आता हे असं आमंत्रण मिळाल्यावर कोण हुशार (पुणेकर) मंडळी सहपरिवार लग्नाला जायला तयार होतील? ... त्यामुळे हॉलमध्ये पाहुणे मंडळी जरा कमीच दिसत होती. तरीसुद्धा उगाच रिस्क कशाला... म्हणून मी सुपर ५० च्या पंगतीत जेवायला बसलो.
वाटलं की, जेवायला बसल्यावर मास्क कशाला गळ्यात अडकवून ठेवायचा.. म्हणून तोंडावरचा N95 मास्क 😷 काढुन टेबलवर ठेवला, आणि पंगतीत गुलाबजाम वाढणाऱ्या मुलाला खुणावू लागलो.. तेवढ्यात दुसरीकडून कोणीतरी आला अन् मास्कला द्रोण समजून त्यात पळीभर वांग्याची भाजी वाढून गेला. त्यात आणि हद्द म्हणजे माझ्या शेजारी बसलेले आजोबा त्या मास्ककडे बोट दाखवून जेवण वाढणाऱ्या एका मुलीला म्हणाले, "मला ह्या अशा वाटीतून बासुंदी आणून दे, वाटी जरा मोठी दिसतेय.."
मास्कमध्ये वाढलेली वांग्याची भाजी बघून त्या मुलीच्या डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. 🤣🤣😁😁
#तो मी नव्हेच🤣
©® #SrSatish🎭™
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा